मुंबई : गुलाब चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या उत्तर आणि ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकले आहे. हवामान खात्याने रविवारी ही माहिती दिली. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे रविवारपासून दक्षिण आणि किनारपट्टी भागात पाऊस सुरू झाला आहे. या चक्रीवादळाचा परिणाम राज्यावर देखील होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांसह मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज असल्याने हवामान खात्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विदर्भ, मराठवाड्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 40 किमी आहे. तसेच, उद्या 28 रोजी मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईतही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तेथेही वाऱ्याचा वेग 30 ते 40 किमी असणार आहे.
कोकणाच्या किनारपट्टीवर मासेमाऱ्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, पुढील 3 दिवस समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असे हवामान खात्याच्या अधिकारी शुभांगी भुते यांनी सांगितले आहे. गुलाब’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रामध्ये दोन दिवस मुसळधार पाऊस शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
गुलाब चक्रीवादळाचा परिणाम -आज आणि उद्या महाराष्ट्रात मेघ गर्जनेसह वादळी वारे आणि मुसळधार पाऊस pic.twitter.com/MeZ3OFYiS7
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 27, 2021
पुण्याच्या परिसरातील घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर पुढील तीन तासात जोरदर पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे घाटमाथ्यावर आज आणि उद्या पावसाचा ‘रेड अलर्ट’ दिल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता, राजेंद्र शिंगणे यांनी केलं रक्तदान करण्याचं आवाहन
- पायातून रक्त वाहत असतानाही सीएसकेचा ‘हा’ खेळाडू मैदानावरून हटला नाही; फोटो व्हायरल
- ‘हे आंदोलन राजकीय नाही’; आंदोलनात घुसणाऱ्या कॉंग्रेस नेत्याला शेतकऱ्यांनी दाखवला घरचा रस्ता
- ‘ऊसतोड कामगार हा राजकारणाचा विषय नव्हेच, श्रेयासाठी मी काम केले नाही!’, पंकजांचा धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष टोला
- राज्यसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या रजनी पाटील यांचे चंद्रकांतदादांनी केले अभिनंदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

