Share

‘व्यंकय्या नायडूंना सभागृहात अश्रू अनावर’, ‘यामुळे’रात्रभर झोपू शकले नाही

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: राज्यसभेत मंगळवारी पेगासस आणि कृषी कायद्यांवरुन विरोधकांनी गदारोळ घातला. यावेळी विरोधी पक्षातील काही खासदार वेलमध्ये जाऊन डेस्कवर चढले आणि आसनाच्या दिशेने नियमपुस्तिका फेकली. तसंच जय जवान जय किसानच्या घोषणादेखील दिल्या. या गोंधळानंतर राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले होते. या सर्व प्रकारानंतर सभापती व्यंकय्या नायडू आज भावूक झाले होते.

काल काही सदस्य बाकावर बसले आणि काहीजण वरती चढले यामुळे सभागृहाचे पावित्र्य नष्ट झाले. विरोधकांच्या गदारोळामुळे आपण रात्रभर झोपू शकलो नाही. असे म्हणताना सभापती नायडू भावूक झाले. आणि त्यांना अश्रू अनावर झाले.

दरम्यान या सर्व प्रकारामुळे नायडू यांनी नाराजी व्यक्त केली. मला फार वाईट वाटले आहे. खूप दु:खही झाले. मात्र हे दु:ख व्यक्त करण्यासाठी काय करावं मला कळलं नाही.कारण मी रात्रभर झोपलो नाही. हे सगळं घडण्यामागे नेमकं काय होतं हे मला समजत नाही आहे.असे त्यांनी भावूक होऊन म्हटले. दरम्यान राज्यसभेत गदारोळ घालणाऱ्या खासदारांवर व्यंकय्या नायडू कारवाई करणार आहेत. याच मुद्द्यावर मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सभागृह नेते पियूष गोयल आणि इतर भाजपा खासदारांनी व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!