Share

‘लखामपूर प्रकरणी युपीसरकार कारवाई करेलच पण, महाराष्ट्रातील शेतकर्‍यांकडे सरकारने लक्ष देण्याची गरज’

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या शेतीची पाहणी आणि शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी मराठवाडा, विदर्भात पाहणी दौऱ्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर गेले होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी करत आहेत. आता उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारावर फडणवीसांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे.

लखीमपूर प्रकरणी उत्तरप्रदेश सरकार कारवाई करेलच. पण, महाराष्ट्रातील शेतकर्‍यांकडे महाविकास आघाडी सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. अतिवृष्टी, पुराने नुकसान झालेल्या राज्यातील आक्रोशित शेतकर्‍यांचा अधिक विचार राज्य सरकारने करावा, तरच त्यांना दिलासा मिळेल, असं म्हणत पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

माझी राज्य सरकारला विनंती आहे की, शेतकर्‍यांप्रती नक्राश्रू ढाळू नका. कुठल्याही दुर्दैवी घटनेपेक्षा त्यावरील राजकारण हे अधिक दुर्दैवी असते. एनसीबीचे नाव काढले की नवाब मलिकांच्या पोटात का दुखते? त्यांचे दुखणे सर्वांना माहिती आहे, मला त्या जखमेवरील खपली काढायची नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!