Share

दोन दिवसांच्या अंधारानंतर लातूरमधील ‘त्या’ गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत

Published On: 

🕒 1 min read

लातूर : साई, नांदगाव, रायवाडी, नागझरी व जेवळी या गावांचा पॉवर ट्रांसफार्मर खराब झाल्यामुळे दोन दिवसापासून विद्युत पुरवठा बंद होता. हा पुरवठा पुर्ववत करण्यासाठी या गावच्या नागरिकांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्याशी समाज माध्यमातून संपर्क केला होता. त्या नुसार युद्ध पातळीवर काम करण्यात आले असून अखेर या गावांचा विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

हरंगुळ सब स्टेशन वरून साई, नांदगाव व नागझरी या गावांना विद्युत पुरवठा जोडण्यात आला असून टाकळी सब स्टेशन वरून नागझरी व जेवळी या गावांना विद्युत पुरवठा जोडण्यात आला आहे. या सर्व गावांचा विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे. विदयुत पुरवठा पुर्ववत करून ग्रामस्थांच्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांनी महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता सामसे व उपअभियंता राख यांना पालकमंत्री देशमुख यांना सूचना दिल्या होत्या.

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यात अनेक गावांमध्येही पाणी शिरल्याने नागरिकांना त्रास सहन करवा लागतोय. त्यातच विद्युत पोल पडल्यामुळे अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडीत झालेला होता. अखेर या गावांचा विद्युत पुरवठा दोन दिवसानंतर सुरू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!