🕒 1 min read
बीड: शनिवारी अचानक जिल्ह्याच्य काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडला. चाक्रीवादाळासह झालेल्या या पावसाने जिल्ह्यातील धारूर तालुक्यात मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलेच त्याच सोबत अनेकांचे घरे जमीनदोस्त या अवकाळी पावसामुळे झाले आहेत. नुकसान झालेल्या गावांची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.
धारूर तालुक्यातील आवरगाव, पांगरी, तांदळवाडी, हसनाबाद या गावांसह परिसरात शनिवारी दुपारी चक्रीवादळासह अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला. यात मोठ्या प्रमाणात केळी, मोसंबी व अन्य फळांच्या बागांचे, तसेच घरांचे नुकसान झाले आहे. शनिवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसासह चक्रीवादळात आवरगाव येथील पाच घरांचे मोठे नुकसान झाले.
तालुक्यात अचानकपणे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आवरगाव, तांदुळवाडी व परिसरामध्ये अनेकांची घरे जमीनदोस्त झाली आहेत. आवरगावमध्ये सौदागर नखाते यांच्या घरावर पिंपळाचे झाड मोडून पडले. तसेच सुंदर दिगंबर जगताप यांचे घर वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाले. अंकुश लोखंडे यांच्या अंगावरती भिंत कोसळली असून ते जखमी झाले आहेत. तर अन्य काहीच्या घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे घरामध्ये पावसाचे पाणी साचले.
विद्युत तारा तुटल्या असून काही ठिकाणी पोल काेसळून पडले आहेत. तर अनेक ठिकाणी चक्रीवादळाच्या तडाख्यात अनेक झाडे जमिनीवर कोसळली. जनावरांची काही गोठेसुद्धा वाऱ्यामुळे उडून गेलेत. वादळाचा फटका आवरगावसह परिसरातील गावांना बसला आहे. या गावांमध्ये जाऊन प्रशासनाने पंचनामे करावेत व झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाबाबत राज्यातील जनतेची केली जाणारी दिशाभूल बंद करा; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘हिंदुस्थानी भाऊ’ला मुंबई पोलिसांनी केली अटक
- दिलासादायक! बीड जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत वाढ
- ‘बंगाल जिंकण्याच्या आग्रहामुळे देश उद्ध्वस्त’, ममतांचा मोदींवर हल्लाबोल
- ‘To all the आईs…Happy Mother’s Day’ ; व्हिडिओ शेअर करत मुंबई इंडियन्स दिल्या मातृदिनाच्या खास शुभेच्छा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
