मुंबई: राज्यावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच आता विद्यापीठ, कॉलेज सुरु राहणार की बंद याबाबत निर्णय घेण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Minister of Higher and Technical Education Uday Samant) यांनी आज तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.
आज दुपारी १२ वाजता राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरु आणि शिक्षण विभागाच्या अधिकारी, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची तातडीची बैठक बोलावली आहे. उदय सामंत या बैठकीत विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोरोनाची स्थिती आणि इतर बाबींची माहिती घेणार आहेत. शैक्षणिक पुढील धोरण काय असावे याबाबत देखील चर्चा होणार आहे. या बैठकीला विभागाचे प्रधान सचिव व संचालक देखील उपस्थित असणार आहेत. सदरील बैठक ऑनलाईन होणार असल्याचे उदय सामंत यांनी ट्वीट करत सांगितले आहे.
उद्या दुपारी 12.00वाजता माझ्या उपस्थित सर्व विभागीय आयुक्त,सर्व जिल्हाधिकारी,सर्व कुलगुरू यांच्या समवेत कोविड 19 च्या परिस्थितीचा आढावा होणार आहे.शैक्षणिक पुढील धोरण काय असावे ह्याबाबत देखील चर्चा होणार आहे.विभागाचे प्रधान सचिव व संचालक देखील उपस्थित असतील, बैठक ऑनलाईन होणार आहे.
— Uday Samant (@samant_uday) January 3, 2022
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विद्यापीठांचे कुलगुरु आणि शिक्षण विभागाचे अधिकारी हे आजच्या बैठकीत अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मिळते आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गलवानमध्ये लाल चिन्यांचा झेंडा उतरवून तिरंगा कधी फडकविणार? ‘शिवसेने’चा सवाल
- …तर मुंबईत लॉकडाऊन करावाच लागेल- इकबाल चहल
- उन्मेष पाटील यांच्या टीकेवर गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले,’हे तर चिल्लर…’
- ‘..तरी चीनचे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधानांबरोबर फाफडा, ढोकळा खाताना दिसतील’, संजय राऊतांचा टोला
- अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती


