Share

…तर मुंबईत लॉकडाऊन करावाच लागेल- इकबाल चहल

Published On: 

मुंबई : दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. असे असतांना मुंबईत आता कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल(Iqubal chahal) यांनी लॉकडाऊन संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना इकबाल चहल म्हणाले की,’महापालिका कार्यक्षेत्रातील रुग्णांची दिवसभरातील संख्या २० हजारांवर गेल्यास मुंबईत लॉकडाऊन करावाच लागेल.’ तसेच पुढे ते म्हणाले की,’मुंबईचा कोरोना आकडा आठ हजारांवर गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्याला कोरोनापासून दूर कसं राहता येईल हे पाहावे. महापालिकेकडे ३० हजार पेक्षा जास्त खाटा सध्या उपलब्ध आहेत. तीन हजार खाटा सध्या भरलेल्या असून औषधे आणि व्हेंटीलेटर उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, काल(३ जाने.)मुंबईत ८ हजार ८२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सोमवारी(२ जाने.) ६२२ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची रुग्णसंख्या आता ५७८ वर पोहोचली असून २५९ रुग्ण बरे झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!