औरंगाबाद : राष्ट्रीय महामार्ग औट्रम घाटातील बोगदा अंतर्गत उपक्रम घाटातील बोगदा व रस्त्याबाबत नागरिकांचा मागण्यांसाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांती नवी दिल्ली येथे भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत घाटातील बोगदा करण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी शिष्टमंडळाला दिली.
औट्रम घाटातील बोगदा कामाला गती मिळणार असून याबाबत हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकार लवकरच या कामाला मंजुरी देणार आहे. नवी दिल्ली येथे सचिव राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अध्यक्ष गिरीधर अरमाने यांच्याशी त्याबाबत सविस्तर चर्चा झाली. औरंगाबाद- चाळीसगाव रेल्वे विभागासोबत संयुक्तपणे रेल्वे लाइनचे काम करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्याची विनंती करण्यात आली. यावेळी खर्च जास्त लागत असल्याचे सांगत हे काम रद्द झाल्याची चुकीची माहिती पसरवण्यात आली.
मात्र या खर्चामध्ये थोडीफार कपात करून मराठवाडा खान्देश पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा बोगदा महत्त्वाचा ठरणार आहे. राष्ट्रीय ५२(२११) हायवे क्रॉसिंगवर आत्तापर्यंत ३५ ते ४० अपघात झाले असून यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये गल्लेबोरगाव ते देवगाव राज्य महामार्ग लासुर स्टेशन हा रस्ता ओलांडताना अपघाताची नवीन समस्या निर्माण झाली आहे. बोरगाव, टाकळी, चापानेर आदी ३५ ते ४० गावांची समस्या असून याबाबतही प्राधिकरणाला योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना देण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे. कन्नड बायपास, अंधानेर येथे सर्व्हिस रोडची गरज असून ती तात्काळ मान्य करावी अशी विनंती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- आरटीई प्रवेश प्रक्रियेत बेकायदेशीरपणे प्रवेश होत असल्यास चौकशी व्हावी; पालक संघाची मागणी!
- विमानतळ विस्तारीकरणाची जमिन घ्या; अन्यथा आरक्षण हटवा, कृती समितीची मागणी!
- पासपोर्ट मिळणे होणार सोपं आणि जलद; आता जवळच्या पोस्ट ऑफिसमध्येच करता येणार अर्ज
- क्रीडा विद्यापीठासाठी चंद्रकांत खैरेंचा कार्यकर्ता बनेल, खा जलीलांचे आवाहन
- #Birthday Special : जाणून घ्या मीराबााई चानूच्या आयुष्यातील काही गोष्टी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

