🕒 1 min read
औरंगाबाद : गेल्या अनेक वर्षांपासून विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र आता लवकरच हा प्रश्न सुटणार आहे. विमानतळ विस्तारीकरणासाठी घेतली जाणारी जमिन तातडीने अधिग्रहीत करावी, अन्यथा आरक्षण हटवावे यासह विविध मागण्यांचे निवेदन औरंगाबाद विमानतळ विस्तारीकरणग्रस्त कृती समिती आणि भाजपतर्फे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना देण्यात आले.
चिकलठाणा विमानतळासाठी तब्बल २८ वर्षांपूर्वी १९९३ मध्ये विमान दुर्घटनेनंतर शेतकर्यांच्या जमिनी संपादीत केल्या आहेत. तेव्हापासून या भागातील विकास खुंटला आहे. असे असतानाच आता पुन्हा विस्तारीकरणाच्या नावाखाली १८२ एकर जमिन अधिगृहीत करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सध्या येथील बाजारभाव हा तीन ते चार हजार प्रति चौरस फुटाप्रमाणे देण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे. कार पार्कींगसाठी उत्तर बाजूला नागरीकांची घरे असल्याने दक्षिण बाजूची जागा घ्यावी.
अन्यथा अधिकचा मोबदला द्यावा, त्याचप्रमाणे या शेतकर्यांचे सुसज्ज आधुनिक पद्धतीने पुनर्वसन करावे. शेती आणि घरधारकांना प्रकल्पग्रस्त घोषित करुन सर्व सुविधा द्याव्यात. तुकड्यातुकड्याने जमिन खरेदी न करता संपुर्ण गटाची जमिन खरेदी करावी. विस्तारीकरण लवकर करणार नसाल तर शेतकर्यांच्या जमिनी एलो झोनमध्ये वर्ग करुन विकास कामांना परवानगी द्यावी, अशा आदी मागण्या केल्या आहेत. याप्रसंगी कृती समितीचे अध्यक्ष बापूसाहेब दहिहांडे, उपाध्यक्ष मदन नवपुते, सचिव सदाशिव पाटील यांच्यासह पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- पासपोर्ट मिळणे होणार सोपं आणि जलद; आता जवळच्या पोस्ट ऑफिसमध्येच करता येणार अर्ज
- क्रीडा विद्यापीठासाठी चंद्रकांत खैरेंचा कार्यकर्ता बनेल, खा जलीलांचे आवाहन
- #Birthday Special : जाणून घ्या मीराबााई चानूच्या आयुष्यातील काही गोष्टी
- महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये ३४६६ जागांसाठी लवकरच होणार मेगाभरती
- सीबीआयचे सरकारला पत्र, पुणे-सातारा टोलनाक्याची चौकशी करण्याची मागितली परवानगी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
