Share

Agnipath Scheme : केंद्रीय गृहमंत्रालयाने घातली ३५ WhatsApp group वर बंदी; नेमके कारण काय?

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: देशभरात ‘अग्निपथ’ योजनेवरून घमासान सुरु आहे. तरुणांनी या योजनेचा तीव्र निषेध करत ठिकठिकाणी आंदोलन छेडले आहे. देशात १३ राज्यांत याविरोधात आंदोलन केले जात आहे. बिहारमध्ये तर अनेक ठिकाणी ट्रेनही जाळण्यात आल्या. या योजनेबद्दल अनेक खोटी माहिती पसरवण्यात येत असल्याचे निदर्शनात आले आहे. यावरच केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठी कारवाई करत बिहारमधील ३५ व्हाॅट्सअप ग्रुपवर बंदी घातली आहे. तसेच १० जणांना खोट्या बातम्या पसरवत तरुणांची दिशाभूल केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

केंद्राकडून व्हाॅट्सअप तथ्य तपासणीसाठी ८७९९७११२५९ हा क्रमांक जारी करण्यात आला आहे. बिहारमधील वाढता विरोध पाहता १२ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्या आहे. बिहारमध्ये बंदही पुकारण्यात आला होता.

दरम्यान अग्निपथ योजनेसंदर्भात तिन्ही सैन्य दलाकडून एक संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये अग्निपथ योजना रद्द होणार नसून लवकरच या योजनेअंतर्गत सैन्य भरती करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र विरोधी पक्षाकडूनही या योजनेला आता तीव्र विरोध होताना दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!