औरंगाबाद : खासदार इम्तिअज़ जलील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी शहरातील अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांनी औरंगाबाद शहरातील उड्डाणपुलाबद्दल महत्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले कि, औरंगाबाद विमानतळा समोर होणारे उड्डाणपूल आता होणार नाही. मात्र, शहरातील तीनही उड्डाणपूल जोडून शहरात अखंड उडण पूल होणार असे सांगितले. रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि जलील यांच्यात झालेल्या मुलाखातीत हे प्रस्ताव ठरला. अशी माहिती जलील यांनी दिली.
दरम्यान औरंगाबाद शहरात ३ छोटे उड्डाणपूल आहे. त्याला अखंड केल्याने नागरिकांना लागणारा प्रवासाचा वेळ कमी लागेल. तसेच विमानाने महाराष्ट्रा बाहेरून येणारे व्यावसायिक अवघ्या १० ते १२ मिनटात विमानतळा वरून शेंद्र एमआयडीसी मध्ये पोहचतील. तसेच हा उड्डाण पूल क्रांती चौक ते केम्ब्रिज पर्यंत असेल. दुधडेरी सिग्नल, सेवन हिल, सिडको, तसेच मुकुंदवाडी असा तो उड्डाणपूल असेल.
तसेच त्यांनी शहरातील आगामी निवडणुका आणि अनेक समस्यांवर भाष्य केले. येत्या अनेक राष्ट्रीय मुद्द्यांवर देखील जलील यांनी वक्तव्य केले. जलील यांनी पेगाससवर देखील भाष्य केले. तसेच त्यांनी आता मराठवाड्यात दोन केंद्रीय मंत्री आहे. आता काम लवकर होईल अशी आशा व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या
- धडाकेबाज अर्धशतक करणारा जडेजा पोहोचला ‘या’ दिग्गजांच्या यादीत पाचव्या स्थानी
- तिसऱ्या दिवसाअखेर इंग्लंड ७० धावांची पीछाडीवर, टीम इंडिया पहिला डाव सर्वबाद २७८
- पुनावाला यांची मोठी घोषणा ; कोवोवॅक्स भारतात ऑक्टोबर महिन्यात होणार लाँच, तर लहान मुलांची…
- नाशिकरांनो सावधान ! एकाच वेळी तब्बल ३० जणांना डेल्टा व्हेरियंटची लागण
- भाजपची सत्ता पुणे महापालिकेमध्ये असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकार दुजाभाव करतंय ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

