Share

IND vs AUS | भारतीय महिला क्रिकेट मधील अविस्मरणीय क्षण, व्हायरल झाली विक्ट्री क्लीप

Published On: 

🕒 1 min read

IND vs AUS | मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये झालेल्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना भारतीय महिला संघाने सुपर ओव्हर (Super Over) मध्ये जिंकला. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करत 187 धावा केल्या होत्या. तर भारतीय संघानेही फलंदाजी करताना 187 धावा करून ऑस्ट्रेलियाला बरोबरीची टक्कर दिली. यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने 20 धावा केल्या होत्या. तर दुसरीकडे सुपर ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियन संघ फक्त 16 धावा काढू शकला. हा सामना जिंकून भारतीय संघाने पाच सामन्यांच्या या मालिकेमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघासाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे होते. हा सामना जिंकून भारतीय महिला संघाने या फक्त मालिकेमध्ये आपले स्थान उंचावले नाही, तर भारतीय महिला क्रिकेटसाठी हा सामना खास सामना होता. येणाऱ्या काळामध्ये भारतीय महिला क्रिकेटचे चित्र बदलणार असून त्याची झलक भारतीय महिला क्रिकेट खेळाडूंनी या सामन्यात दिली आहे.

मुंबई येथील डी वाय पाटील स्टेडियमवर हा सामना पार पडला. या सामन्यादरम्यान स्टेडियम खचाखच प्रेक्षकांनी भरलेले होते. महिला क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे, हे या सामन्यादरम्यान दिसले आहे. महिला क्रिकेटमध्ये आतापर्यंत दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघाचा दबदबा राहिला आहे. अशा परिस्थितीत या सामन्यामध्ये सुपर ओवरमध्ये भारतासाठी ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे कठीण आहे, असे वाटत होते. मात्र, भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत सुपर ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे.

ऑस्ट्रेलियन संघातील रिया घोषने सुपर ओवरमध्ये पहिल्याच चेंडू षटकार मारला होता. दरम्यान, भारतीय संघ हा सामना हरू शकतो असे वाटत होते. मात्र भारतीय संघातील स्मृती मंधानाने तीन चेंडूमध्ये 13 धावा करत सुपर ओव्हर एकतर्फी करून टाकली होती. या सुपर ओवरमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने 20 धावा काढल्या. भारतीय संघातील गोलंदाज रेणुकाने सुपर ओव्हरमध्ये पहिल्या चार चेंडूमध्ये ऑस्ट्रेलियाला फक्त 6 धावा काढू दिल्या.

हा सामना जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ हातात तिरंगा घेऊन मैदानावर फेरफटका मारताना दिसला आहे. भारतातील क्रिकेटसाठी हा एक ऐतिहासिक आणि अविस्मरणीय क्षण होता. या सामन्यानंतर भारतामध्ये महिला क्रिकेट संघाची लोकप्रियता नक्कीच वाढणार आहे. अलीकडेच बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूंचे शुल्क पुरुष क्रिकेट खेळाडूंच्या बरोबरीने वाढवले आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ पुरुष संघापेक्षा कमी नाही, हे कालच्या सामन्यानंतर सिद्ध झाले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!