औरंगाबाद : ग्रामपंचायत निवडणुकांत एमआयएम पक्षाने पाठिंबा दिलेल्या पॅनलला यश मिळाले आहे. प्रदेशाध्यक्ष, जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील हे निवडणुकीच्या प्रचारात नव्हते. शिवाय हैदराबादहूनही विशेष पथक औरंगाबादला पाठविण्यात आली नाही. तरीही स्थानिक आजी-माजी पदाधिकारी यांच्या परिश्रमामुळे ‘एमआयएम’ला जिल्ह्यात ७०हून अधिक जागा मिळाल्याची चर्चा पक्षामध्ये सुरू आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत ‘एमआयएम’ने जास्त उमेदवार उभे केले नाहीत. कमी उमेदवार उभे करून विजय मिळवून आणण्याचे धोरण पक्षाने स्वीकारले. पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हैदराबादहून विशेष पथक येत असते. ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्ष चिन्हावर नसतात. यामुळे हैदराबादहून पथक आले नाही. जिल्ह्याचे खासदार हे प्रचारासाठी चेहरा होता. मात्र, खासदार ओवैसी यांच्या आदेशावरून खासदार जलील यांना गुजरातला जावे लागले.
पक्षाचे वरिष्ठ नसल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीचा भार स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर होता. प्रभारी जिल्हाध्यक्ष यांनी या निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी विविध आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिली होती. तालुकाध्यक्ष किंवा प्रभारी यांच्या सामूहिक प्रयत्नामुळे ‘एमआयएम’ला विजय खेचून आणता आला असल्याची चर्चा सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ठाकरे शेतकरी आंदोलनाचं सोडा आधी किमान १० हजार तरी शेतकऱ्यांना द्या !’
- कृषी कायद्यावरून हरिभाऊ बागडेंनी दिला ‘हा’ सल्ला
- ‘ठाकरे शेतकरी आंदोलनाचं सोडा आधी किमान १० हजार तरी शेतकऱ्यांना द्या !’
- सलाम : दुर्घटनेत पत्नी गमावली, स्वतः जबर जखमी झाले मात्र रुग्णालयातही श्रीपाद नाईक ‘ऑन ड्युटी’
- ‘महाविद्यालये सुरु करण्याबाबत शिक्षण खातं आणि मुख्यमंत्री यांच्यात कुठलाही समन्वय नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

