Share

कृषी कायद्यावरून हरिभाऊ बागडेंनी दिला ‘हा’ सल्ला

Published On: 

औरंगाबाद : शेतकऱ्यांचे जीवन बदलण्यासाठीचे कायदे भाजपने केले. पण यासाठी केवळ भाजपच आग्रही होता असे नाही तर इतर पक्षांच्या जाहीरनाम्यातही त्याचा स्पष्ट उल्लेख होता. त्याचाही शोध घ्यावा, असे आवाहन भाजप नेते आमदार हरिभाऊ बागडे यांनी केले.

युवक बिरादरी, वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र मुंबईतर्फे नुकतेच विधान भवनात अभिरूप युवा संसद स्पर्धा घेण्यात आली. त्यात एमजीएम वृत्तपत्रविद्या, जनसंवाद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाचपैकी चार पुरस्कार पटकावले. आशय येडगेने युवाभूषण पुरस्कार पटकावला. या सर्वांचा सत्कार सोहळा बागडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, नामदेवराव पवार, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, प्राचार्य प्रतापराव बोराडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य भाऊसाहेब राजळे, ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर, एमजीएम वृत्तपत्रविद्या, जनसंवाद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी अभिरूप युवा संसद सादरीकरण झाले. त्यात शेतकरी आंदोलनाकडे सत्ताधारी लक्ष देत नाहीत. हाथरस प्रकरणात दुर्लक्ष झाले, असे मुद्दे मांडण्यात आले. तो संदर्भ देत बागडे म्हणाले की, २००६ ला कंत्राटी शेती कायदा महाराष्ट्रात लागू झाला. तोच केंद्रानेही केला. हे पत्रकारांनी सर्वांसमोर आणले पाहिजे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!