Share

‘उद्धव ठाकरेंनी अतिवृष्टीग्रस्तांना ५० हजार हेक्टरी मदत देऊन दाखवावी’, हरिभाऊ बागडेंचे आव्हान

Published On: 

औरंगाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेकडो लोकांचे जीव गेले, ५० लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार मराठवाड्यात फिरकलेदेखील नाहीत. यापूर्वी ५० हजार हेक्टरी मागणी करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आता ही मदत देऊन दाखवावी, असे आव्हान माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत, पीक विम्याची रक्कम मिळावी या मागणीसाठी किसान मोर्चाच्या वतीने विभागीय आयुक्तालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘मातोश्रीचा पोपट काय म्हणतोय, शेतकऱ्यांना मदत नाय म्हणतोय’, ‘बारामतीचा पोपट काय म्हणतोय, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना भेटायचे नाय म्हणतोय’, ‘हेक्टरी पन्नास हजार मदत मिळालीच पाहिजे,’ अशा घाेषणा देण्यात आल्या.

हरिभाऊ बागडे म्हणाले, ‘तीन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंनी बीड जिल्ह्यात जाऊन तेथील शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची मागणी केली होती. अजित पवार यांनीही हीच मागणी केली होती. आता ठाकरे मुख्यमंत्री, तर अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. त्यांची ही मागणी पूर्ण केली पाहिजे. तसे न करता वीज बिलासाठी डीपी बंद करून सरकार शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम करत आहे, असा आरोप बागडेंनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!