🕒 1 min read
मुंबई : दसरा मेळाव्यात शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट हे दोन्ही गट आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. यावेळी दोन शिवसेना गट तयार झाल्याने दसरा मेळावा कोण घेणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर दुसरीकडे काल शिवसेनेच्या वतीने नेस्को सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होतं. त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की, सध्या मुंबई महानगरापालिकेच्या निवडणूकांचं वारं घुमू लागलं आहे. त्यामुळे या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजप पक्षाला एक आव्हान देण्यात आलं आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंमत असेल तर महिनाभरात. मुंबई महापालिका आणि राज्य विधानसभा निवडणूक घेऊन दाखवावी, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजप दिले आहे. काल व्यासपिठावर असताना ते बोलत होते.
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, ही आपली पहिली निवडणूक आहे, असे मानून संपूर्ण ताकदीने लढण्याचे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले आहे. तर ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही शेवटची निवडणूक असेल,असंही त्यांनी म्हटलं आहे.
तसेच, काल संध्याकाळी साडेसात वाजता उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरूवात झाली. यासाठी शिवसेनेकडू्न जय्यत तयारी करण्यात आली होती. त्यावेळी सुरूवातीलाच बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आधी पाहिले आमचे वडील जागेवर आहेत का ते पाहिलं. आतापर्यंत मुलं पळवणारे पाहिले होते. आता बाप पळवणारेही आल्याची जहरी टीका उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली.
महत्वाच्या बातम्या :
- राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या महिलांना रौप्य तर पुरुषांना कांस्य पदक
- Diabetes Remedies | शुगरच्या रुग्णांसाठी ओवा आहे रामबाण उपाय,जाणून घ्या!
- Dark spot on face | ‘हे’ घरगुती उपाय वापरुन तुमचा चेहरा होईल डाग मुक्त,जाणून घ्या!
- Hair Care | केसांच्या समस्या अनेक मात्र उपाय केवळ एक, जाणून घ्या ‘हा’ एक उपाय
- Solapur | कौतुकास्पद! राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत सोलापूरचे वर्चस्व
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
