🕒 1 min read
मुंबई : ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असं नाव दिलं असून,’मशाल’ हे चिन्ह दिलं आहे. अशातच उरणमधून काही शिवसैनिक मशाल घेऊन मातोश्रीवर दाखल झाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तेव्हा आपण पुन्हा शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री होणार असल्याची शपथ घेतली आहे. यावरुन अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.
सदस्य नोंदणी करा कागदांची लढाई हारता कामा नये, मी पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणार, असं उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांन समोर घोषित केलं. शिवसेना संपवण्याचा ज्या ज्या वेळी प्रयत्न होतो, त्यावेळी शिवसेना आघात करणाऱ्याला गाडून चार पटीने उभी राहते, असं देखील ते म्हणाले.
काही काळासाठी आपलं चिन्ह गोठवलेले आहे. पण मला दुःख या गोष्टीच होत कि, ज्या चिन्हाची पूजा आजही आपल्या घरात होते. ते धनुष्यबाण तसंच ठेवलेलं आहे. आजपर्यत अनेकांनी शिवसेना संपवण्यासाठी वार केले. पण शिवसेना संपवण्याचा कोणी प्रयत्न केला नव्हता. शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा कोणी प्रयत्न केला नव्हता. हे फक्त ज्यांचं रक्त गोठलेलं आहे, तीच लोक हे करू शकतात, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
मी शिवतीर्थावर जे बोललो तेच आज मी इथेही बोलत आहे. ही माझी भावना आहे. शिवसेना 56 वर्षांची झाली आहे. या 56 वर्षांमध्ये शिवसेनेने असे 56 जण पाहिले. मात्र ज्यांनी ज्यांनी शिवसेनेवर आघात करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यामुळे शिवसेना संपली नाही तर त्यांना गाडून शिवसेना पुढे गेली आहे, असं देखील ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray । ज्यांचं रक्त गोठलेलं आहे, तीच लोक चिन्ह गोठवू शकतात; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
- Gulabrao Patil | राजीनाम्यावरुन महाभारत! उद्धव ठाकरे गटाच्या आरोपांना गुलाबराव पाटलांचं साडेतोड उत्तर, म्हणाले…
- Narendra Modi । कोरोनाची भविष्यवाणी करणाऱ्या महंतांचे मोदींनी घेतले आशीर्वाद, नव्या भविष्यवाणीने टेन्शन वाढले
- Keshav Upadhye | “नाना तुमच दुःख…”, नाना पटोलेंच्या ‘त्या’ टीकेला केशव उपाध्येंचं प्रत्युत्तर
- Ambadas Danve | इथे निवडणूका होतील तेव्हा हनुमान चालीसा म्हणायला लोकं तुम्हाला घरी बसवतील – अंबादास दानवे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
