🕒 1 min read
मुंबई: एकनाथ शिंदेंच्या गटात शामिल होऊन ४० आमदारांनी बंड करत शिवसेनेला मोठा धक्का दिला. या फुटीमध्येही १५ आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर निष्ठा कायम राखली आहे. या निष्ठावंत आमदारांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भावूक पत्र पाठवून त्यांचे कौतुक केले आहे.
उद्धव ठाकरेंनी पत्रात काय म्हटले?
जय महाराष्ट्र! शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपले सर्वस्व आहे. निष्ठा आणि अस्मितेची महती शिवसेनाप्रमुखांनीच आपल्याला शिकवली. आईच्या दुधाशी बेईमानी करू नका, हा त्यांचा निष्ठेबाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्माननीय आहे.
*शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेना *आमदार श्री रवींद्र वायकर साहेब* यांना दिलेले पत्र.. pic.twitter.com/4hPy4b3P6x
— Ravindra Waikar (@RavindraWaikar) July 11, 2022
शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक असल्याचे दाखवून दिलेत. कोणत्याही धमक्या, प्रलोभनांना बळी न पडता आपण शिवसेनेसोबत राहिलात आपल्या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला आणि शिवसेनेला बळ मिळाले. आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो, असे पत्रात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Alia-Ranbir : बाळ झाल्यानंतर आलिया भट्ट फिल्म इंडस्ट्री सोडणार का? यावर रणबीरने दिलं उत्तर, म्हणाला…
- Bharat Gogavale : “…तेव्हा लाज वाटली नव्हती का?”, शिंदे गटातील आमदाराचा आदित्य ठाकरेंना सवाल
- Shalini Thackeray : “अगोदर डुक्कर, गद्दार विशेषणे लावायची मग…”, शालिनी ठाकरेंचा ‘शिवसेने’वर निशाणा
- Shinde VS Thackeray : आजची सुनावणी लांबणीवर?; शिंदे-ठाकरे सत्तासंघर्षाच्या न्यायालयीन निर्णयाकडे लक्ष
- IND vs ENG : सूर्याची तुफानी शतकी खेळी व्यर्थ, इंग्लंडचा १७ धावांनी विजय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
