Share

Shalini Thackeray : “अगोदर डुक्कर, गद्दार विशेषणे लावायची मग…”, शालिनी ठाकरेंचा ‘शिवसेने’वर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी ( Aditya Thackeray) मुंबईसह राज्यभरात ‘निष्ठा यात्रा’ काढण्यास सुरवात केली आहे. या यात्रेद्वारे आदित्य ठाकरे बंडखोरांच्या मतदार संघात शक्तीप्रदर्शन करत आहेत. काल निष्ठा यात्रेच्या निमित्ताने दहिसरमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदारांना त्यांनी मातोश्रीवर यावे असे आवाहन केले आहे. यावरूनच मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

“बंडखोर आमदारांना अगोदर डुक्कर,गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग या चिमण्यांनो परत फिरा रे….अशी आर्त हाक घालायची. पक्ष सोडून गेलेल्यांच्या परतण्याचा विचार सुद्धा न करणारे एकमेव शिवतीर्थावरील एकच ठाकरे ते म्हणजे राजसाहेब ठाकरे!”, असे ट्वीट शालिनी ठाकरे यांनी केले आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरे म्हणाले कि, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले बंडखोर आमदारांना जर परतयाचे असेल तर अजूनहि मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत, त्यांनी मातोश्रीवर यावे. शिवसैनिक नेहमीच मातोश्रीवर येतात, त्यांना परतायचे आहे, त्यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घ्यावी, त्यांना माफ करण्यात येईल. तसेच ज्यांना तिथे राहायचे असले, त्यांनी हिंमत असेल तर निवडणुकांना सामोरे जावे, असे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!