नवी दिल्ली : देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी (केंद्र शासित प्रदेश) विधानसभा निवडणुकांसाठी तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलेलं दिसून येत आहे. भाजपला फारसं यश मिळवता न आलेल्या पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या राज्यात कमळ फुलवण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.
सध्या प. बंगाल विधानसभा निवडणूक प्रचार जोरात सुरु असताना दुसरीकडे तामिल्नादुम्द्ये देखील वातावरण चांगलेच तापले आहे. यावेळी एका सभेत बोलताना द्रमुकचे प्रमुख एम के स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिने यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या छळामुळे आणि दबावामुळेच भाजपा नेते अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू झाल्याचे असे धक्कादायक आरोप त्यांनी केले आहेत. एका वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.
@udhaystalin ji please do not use my Mother's memory for your poll propaganda! Your statements are false! PM @Narendramodi ji bestowed utmost respect and honour on my Mother. In our darkest hour PM and Party stood by us rock solid! Your statement has hurt us @mkstalin @BJP4India
— Bansuri Swaraj (@BansuriSwaraj) April 1, 2021
मात्र यांनतर या गंभीर आरोपांना सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज तसेच अरुण जेटली यांची मुलगी सोनाली जेटली यांनीही ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. यावेळी बांसुरी स्वराज म्हणाल्या की, ‘उदयनिधीजी कृपया माझ्या आईच्या नावाचा उपयोग आपल्या निवडणूक प्रचारासाठी करू नका! आपली विधाने खोटी आहेत! पंतप्रधान नरेंद्रामोदि यांनी माझ्या आईला अत्यंत आदर आणि सन्मान दिला. आमच्या सर्वात कठीण काळात पंतप्रधान आणि पार्टी आमच्या बाजूने जोरदार उभे राहिले! मात्र तुमच्या या वक्तव्याने आम्ही दुखावले आहोत. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदींच्या दबावामुळेच अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू’ द्रमुकच्या नेत्याचे गंभीर आरोप
- शाहरुखला आयपीएलआधी मोठा दिलासा ; ‘हा’ खेळाडू कॅम्पमध्ये होऊ शकतो सहभागी
- ‘उगाच इंदिरा गांधी किंवा मोदी-शहाप्रणीत भाजपास दोष का द्यायचा ?’
- आयपीएल न खेळता ‘या’ खेळाडूला मिळणार 7 कोटी रुपये
- आनंद महिंद्रा यांनी शब्द पाळला ; टी नटराजनला मिळाली थार


