Share

सावंगी येथील शेततळ्यात दोन मित्रांचा बुडुन मृत्यु

Published On: 

औरंगाबाद : हर्सुल सावंगी परिसरातील एका शेततळ्यातील पाण्यात बुडून दोन तरूणांचा मृत्यू झाला. फायरब्रिगेडच्या मदतीने दोन्ही तरुणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्यांचे मृतदेह घाटी मध्ये पाठविण्यात आले. यात मोहम्मद असलम नियाजी वय २२ रा. दिल्ली गेट औरंगाबाद, शेख साजिद शेख याकुब वय २४ रा.कैलास नगर औरंगाबाद अशी तरुणांची नावे आहे.

फुलंब्री पोलिस ठाण्याच्या हद्दीतील औरंगाबाद रोडवरील हर्सुल सावंगी परिसरातील गट नंबर ८२ |२ ,मधील शेततळ्यात औरंगाबाद शहरातील दोन तरूण दि. २५ रोजी सकाळी १०:३० वाजेच्या दरम्यान पोहायला गेले असता, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही तरूणांचा बुडुन मृत्यू झाला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

यात मोहम्मद असलम नियाजी वय २२ रा. दिल्ली गेट औरंगाबाद, शेख साजिद शेख याकुब वय २४ रा.कैलास नगर औरंगाबाद या दोघांचा पाण्यात बुडुन मृत्यु झाला. त्यांचे मृतदेह अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांच्या मदतीने वर काढण्यात आले. त्यानंतर घाटी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेची फुलंब्री पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक मुदीराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!