🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अखेर विद्यापीठांमधील अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार आहे. त्यासाठी तालुकास्तरावर एक केंद्र महाविद्यालयांस देण्यात आले आहे. या केंद्रात सर्व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. परंतु नेवासा तालुक्यातील विद्यार्थ्यांची संख्या पाहता या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुळा एज्युकेशन सोसायटी सोनईचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे परीक्षा नियंत्रक यांच्याशी संपर्क साधून नेवासा तालुक्यात सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा या दोन केंद्रांना मंजुरी मिळवली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात दररोज ९०० ते १००० कोरोना बाधित रुग्ण सापडत असल्यामुळे अशा परिस्थितीमध्ये एका केंद्रावर पूर्ण तालुक्याच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे कठीण होते. म्हणूनच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून प्रशांत गडाख यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे परीक्षा नियंत्रक यांच्याशी संपर्क साधून नेवासा तालुक्यासाठी दोन केंद्र मंजूर केले आहेत.
त्यामुळे नेवासा तालुक्यातील अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या सर्वच विभागाच्या विद्यार्थ्यांना आपल्या घरापासून जवळच अंतिम वर्षाची परीक्षा कोरोनाची काळजी घेत देता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालक वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. प्रशांत गडाख यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत नेवासा तालुक्यात दोन परीक्षा केंद्र मंजूर करून आणल्याबद्दल विद्यार्थी व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .
महत्वाच्या बातम्या :-
- पैसासाठी अडवणूक करणार्या खासगी रुग्णालयांवर कारवाईचा बडगा, राजेश टोपेंची प्रतिक्रिया
- चक्क कोरोनाबाधित रुग्णच शिरला आरोग्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आणि मग…
- कृषी विधेयकाला विरोध करणाऱ्यांना भविष्यात पश्चाताप होईल- राम शिंदे
- अहमदनगरमध्ये रुग्णांना बेड मिळेना; जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 40 हजारांवर
- प्रसिद्ध कीर्तनकार रामदास महाराज कैकाडी यांच्या निधनाने नगरवर शोककळा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
