Share

उस्मानाबाद जिल्ह्यात ट्रक लुटला; तांब्याचे साहित्य लंपास!

Published On: 

उस्मानाबाद : कोरोनाचा वाढता पादुर्भाव थांबवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागलेली आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात गुन्हेगरीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अशीच एक घटना तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग शिवारात घडली. थांबलेल्या ट्रकमधील तांब्याचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चोरी, लुटालुटीच्या वाढत्या घटनेमुळे नागरिकात भितीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकातून होत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, हैदराबाद जिल्ह्यातील पानमंडी येथील मंहमद असलम बाबुमियॉ हे हैद्राबाद- कोल्हापूर मार्गावर ट्रकमधून तांब्याच्या साहित्याची वाहतूक करीत होते. दरम्यान, शनिवारी रात्री त्यांनी नळदुर्ग शिवारातील घाटात मंदिराजवळ ट्रक उभा केला होता. दरम्यान, चोरट्यांनी संधी साधून या ट्रकमधील तांबा पट्टीचे ७ नग चोरून नेले. ही चोरीची घटना निदर्शनास येताच महंमद यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली आहे.

त्यावरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चोरीच्या वाढत्या घटनेमुळे वाहनधारकांसह नागरिकात घबराटीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी लुटालूट रोखण्यासाठी गस्त वाढवून प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे. अशा घटना येत्या काळात न घडाव्या म्हणून प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यायला हवी.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!