Share

लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट ओढावल्याने व्यापाऱ्याची आत्महत्या

Published On: 

बीड: कोरोना काळात अनेकांचे जीव कोरोना झाल्यामुळे जात आहेत तर अनेकांचे जीव कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटामुळे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले हिते, त्यामुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यातून सावरत असतानाच पुन्हा दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन लावलं त्यामुळे पुन्हा संकट ओढवले. अशा परिस्थितीत अनेकांनी आत्महत्या करणे सोपे समजले. असाच प्रकार शहरात किल्लेधारूर येथे झाला आहे.

शहरातील किल्लेधारूर मुख्य रस्त्यावरील असलेल्या मोबाईल शॉपीचे मालक धनंजय पिलाजी (वय ३८) यांनी बुधवारी (ता.२३) दुपारी एक वाजण्याचे सुमारास दुकानातील केबीनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बसस्थानकानजीक असलेल्या मोबाईल शॉपीचे मालक धनंजय पिलाजी नेहमीप्रमाणे दुकान उघडले. काही ग्राहक व काही व्यापारी आले. नेहमीप्रमाणे बोलणे व व्यवहार झाले. वर्दळीनंतर दुपारी एकच्या सुमारास दुकानात आलेल्या एका ग्राहकाने केबीन ढकलुन पाहिल्यानंतर आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांचा पंचनामा सुरु आहे.

जवळच्या कुटुंबीयातुन मिळालेल्या माहितीप्रमाणे दीड वर्षाचे लॉकडाऊनमुळे आर्थिक विवंचनेमुळेच झालेल्या तणावातुन ही घटना घडली आहे. अनेकांचे धंदे तसेच हातचे काम या लॉकडाऊनच्या काळात गेले आहेत. गेल्या वर्षीपासून आर्थिक संकटमुळे आत्महत्या झालेले प्रमाण वाढले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सर्वत्र लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या पोटाचे काय, यावर कोणी तोडगा नाही काढला. मृत धनंजय यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!