औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य किसान सभा व महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन यांच्या वतीने मंगळवारी (दि.२६) प्रजासत्ताक दिनानिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दिल्ली गेट ते भडकल गेट अशी ट्रॅक्टर रॅली यावेळी काढण्यात आली. शेतकरी विरोधी कायदा रद्द करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
ट्रॅक्टर रॅलीसाठी पोलिसांनी परवानगी नाकारून गुन्हे दाखल करण्याचा लेखी इशारा देखील दिला होता. मात्र त्याला न जुमानता ही रॅली काढण्यात आली. दिल्ली गेट येथून दुपारी दोन वाजता रॅलीला सुरुवात झाली. याप्रसंगी तीन कृषी कायदे रद्द करा, विज विधेयक २०२० चे कायद्यात रूपांतर करू नका, किमान हमीभाव मिळण्याचा कायदा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी हरचरण सिंग गुलाटी, जयमाल सिंह रंधवा, कॉ. मनोहर टाकसाळ, इक्बाल सिंग गिल, जकीया बेगम, सरदार हरि सिंग, नवीन ओबेराय, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अशोक जाधव, जिल्हा सचिव कैलास कांबळे, लाल बावटा शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष तथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य कॉ. प्रा.राम बाहेती यांची उपस्थिती होती. वाळूज, तुर्काबाद, खराडी, तळ पिंपरी, शेंदुरवादा, सावखेडा, गाजगाव, वावना, निधोना, आळंद, हातनूर, टापरगाव, कन्नड, मोढा, सिल्लोड आदी ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाने रॅलीत सहभाग नोंदविला.
महत्वाच्या बातम्या
- दिल्लीतील हिंसक आंदोलक; अण्णा हजारेंनी मांडलं ‘हे’ सडेतोड मत!
- विदर्भाचा मागासलेपणा गोसीखुर्दच्या पाण्याने धुऊन काढणार; मुख्यमंत्र्यांचे विदर्भवासीयांना आश्वासन
- ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात संगनमत करून आर्थिक लुबाडणूक व फसवणुकीचा गुन्हा दाखल करा- मनसे
- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजपची ‘बी’ टीम; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
- शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आदित्य ठाकरेंचा मोठा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

