Share

आज पंतप्रधान देशाला संबोधित करणार, कलम ३७० काय बोलणार याकडे जगाचे लक्ष

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : जम्मू-काश्मीर राज्याची पुनर्रचना, नव्या लडाख राज्याची निर्मिती, जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० मधील तरतुदी हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना आज संबोधित करणार आहेत. याबाबतच वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. भाषणाची वेळ मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. यापूर्वी २७ मार्च रोजी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले होते. दरम्यान, पंतप्रधान मोदी बुधवारी देशाला उद्देशून भाषण करणार होते मात्र सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे यात बदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

केंद्राने जम्मू-काश्मीरबाबत जे पाऊल उचलले आहे त्याबाबत नेमकी माहिती जनतेपर्यंत पोहचावी हा यामागचा उद्देश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी २७ मार्च रोजी पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले होते. ‘ए-सॅट’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी प्रक्षेपणाबाबत त्यांनी देशाला माहिती दिली होती. त्यानंतर आजच देशाला उद्देशून होत असलेल्या मोदींच्या भाषणाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.

शेवटी आपला तो आपलाच अन परका तो परकाच – राम शिंदे

जीवनात हाच दिवस पाहण्याची प्रतीक्षा करत होते, सुषमा स्वराज यांचे अखेरचं ट्विट

जीवनात हाच दिवस पाहण्याची प्रतीक्षा करत होते, सुषमा स्वराज यांचे अखेरचं ट्विट

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!