Share

‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतंय; काँग्रेसची मोदींवर वादग्रस्त टीका

Published On: 

🕒 1 min read

बंगळुरु : कर्नाटकमध्ये दोन पोटनिवडणुकांच्या निमित्ताने प्रचार सुरु आहे. प्रचारावेळी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांचा निरक्षर असा उल्लेख केला आहे. यामुळे सध्या भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक कलह सुरु आहे.

काँग्रेसने शाळा बांधल्या पण मोदी कधी शिक्षण घेण्यासाठी गेले नाहीत. काँग्रेसने प्रौढांसाठी शिकण्यासाठी योजनाही उभारल्या, मोदी तिथेही शिकले नाहीत. भीक मागण्यास मनाई असूनही उपजीविकेसाठी भीक मागण्याची निवड करणारे लोक आज नागरिकांना भिकारी होण्याकडे ढकलत आहेत. ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला हे भोगावं लागत आहे, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

काँग्रेसने केलेली ही टीका मोदींवर वैयक्तिक टीका असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. कर्नाटकमधील भाजपचे प्रवक्ते मालविका अविनाश यांनी ‘काँग्रेस इतक्या खालच्या स्तराला जाऊ शकतं’, अशी टीका केली आहे. तसंच यावर प्रतिक्रिया दिली जावी इतकीही याची किंमत नसल्याचं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!