🕒 1 min read
लातूर : राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना दिलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे. या संदर्भात आपण तहसीलदार, जिल्हाधिकारी, मंत्री, मुख्यमंत्री या सर्वांना निवेदन देऊन आता थकलो आहोत. त्यामुळे आता आई तुळजाभवानी चरणी निवेदन अर्पण करत असल्याचे मत भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केलय. शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळावी या मागणीसाठी त्यांनी औसा ते तुळजापूर पदयात्रा काढली. या निमित्त ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कोकणामध्ये आलेल्या महापुरग्रस्तांना नियमाच्या बाहेर जात मदत देण्यात आली होती. त्याच प्रमाणे मदत मराठवाड्यातील आणि विदर्भातील शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी आपण केली होती. मात्र, राज्य सरकारने शेतकऱ्यांना तोंडाला पाने पुसली असून त्यांनी केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचा आरोप आमदार पवार यांनी केला आहे.
आम्ही निघालो; निद्रिस्त आघाडी सरकारला जागं करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या व्यथेला वाचा फोडण्यासाठी आणि आई तुळजाभवानी ला साकडं घालण्यासाठी.???? #औसा_ते_तुळजापूर_पदयात्रा#ओला_दुष्काळ #maharashtrarains @BJP4Maharashtra pic.twitter.com/dBciy1ktN0
— Abhimanyu Pawar (@AbhiPawarBJP) October 16, 2021
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांना मदत करण्याची बुद्धी दे, अशी मागणी आपण आई तुळजाभवानी चरणी करत असल्याचेही ते म्हणाले. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मीडियाच्या माध्यमातून माझ्याशी बोलण्याची गरज नाही’, सोनिया गांधींचा स्वपक्षीय नेत्यांना टोला
- राज्य सरकारचं ढिसाळ नियोजन आणि नफेखोरीमुळे वीज संकट; दानवेंचा घणाघात
- ‘…मग राणे, राज ठाकरे पक्ष सोडून का गेले?, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल
- लालफितशाही: सेवानिवृत्तीची रक्कम न मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
- ‘दगाफटका करून सत्तेत आलेल नेते कधीच जनहिताचे काम करू शकत नाहीत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
