🕒 1 min read
मुंबई: अनेक राज्यांत सध्या जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे धर्मांतर बंदी कायद्याची मागणी सातत्याने केली जात असल्याचे दिसून येते. याबाबतच महाराष्ट्रातही हा कायदा लागू करण्यासंदर्भात भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्वीट केले आहे.
“आता महाराष्ट्रात भगवाधार्यांची सत्ता आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि इतर अनेक राज्यांप्रमाणे धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची वेळ आली आहे. निष्पाप महिलांना अडकवलं आणि छळलं जातंय, त्यांना संरक्षण देण्याची गरज आहे!
लवकर सुरू करूया. जय श्री राम!”, असे ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे.
Now that we have a Bhagwadharis ruling in Maharashtra..
It’s time we bring ANTI CONVERSION LAW like UP…MP..Gujarat and many other states..
We need to protect innocent women bein trapped and harassed!!
Let’s begin soon ????
Jai Shree Ram— Nitesh Rane (@NiteshNRane) July 21, 2022
दरम्यान कर्नाटक सरकारने केलेल्या विधेयकात सक्तीचे धर्मांतर केल्यास तीन ते पाच वर्षाच्या तुरुंगवासासह 25 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. अल्पवयीन, महिला किंवा एससी/एसटी व्यक्तीचे धर्मांतर केल्यास तीन ते 10 वर्षाचा तुरुंगवास आणि 50 हजार रुपये दंड होऊ शकतो. यासारखाच कायदा महाराष्ट्रातही करावा, याचे संकेत नितेश राणे यांनी ट्वीटद्वारे दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- County Cricket : चेतेश्वर पुजाराच्या द्विशतकावर इंग्लंड फिदा, केलं भव्य स्वागत; पाहा VIDEO!
- Raj Thakrey : राज ठाकरेंची विचारपूस करण्यासाठी गायिका आशाताई ‘शिवतीर्थ’ वर
- Vijay devarkonda | विजय देवरकोंडाच्या ‘लिगर’कडून चाहत्यांना आहे ‘ही’ अपेक्षा; लवकरच होणार रिलीज
- Rupali Patil : चित्रा वाघ यांचं डोके ठिकाणावर आहे का ?; रुपाली पाटलांचा संतप्त सवाल
- Chitra Wagh | मला घाण भाषेत बोललं जात आहे, मेसेज केले जात आहेत – चित्रा वाघ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
