नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी औरंगाबादमध्ये केलेल्या एका वक्तव्यावरून शिवसेना-भाजपच्या संभाव्य युतीच्या चर्चेला नव्यानं तोंड फुटलं आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी युतीबद्दल सकारात्मक वक्तव्य केलं आहे. ‘अजूनही वेळ गेलेली नाही, अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर युती होऊ शकते,’ असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. एका न्यूज पोर्टल ला दिलेल्या मुलाखतीत रामदास आठवले बोलत होते.
‘भाजप आणि शिवसेना यांनी युती करावी ही माझी आधी पासूनची भूमिका आहे. मुख्यमंत्री पदाचा कालावधी दोन्ही पक्षांनी वाटून घेऊन युती करावी असे मी भाजप आणि शिवसेना नेतृत्वाला नेहमी सुचविले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचा माजी सहकारी आणि भावी सहकारी पक्ष असा उल्लेख करून भविष्यात भाजप सोबत युती चे संकेत दिले असून या मुळे भाजप शिवसेना आरपीआय महायुती चा मतदार आनंद व्यक्त आहे. मी देखील मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचे स्वागत करीत आहे,’ असे नागपूर मध्ये रामदास आठवले यांनी भाष्य केलं आहे.
पुढे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचे तोंडभरून कौतुक केले. ‘उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती. मात्र, त्यांनी मांडलेल्या अडीच-अडीच वर्षाच्या प्रस्तावावर शिवसेना-भाजपमध्ये एकमत होऊ शकलं नाही. त्यामुळं जे व्हायला नको होतं, ते झालं. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत त्यांनी आघाडी करणं योग्य नव्हतं,’ असं आठवले म्हणाले.
‘उद्धव ठाकरे हे अत्यंत साधेभोळे आणि चांगले गृहस्थ आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार आहेत. त्यांनी पुन्हा एकदा महायुतीत यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी पुन्हा स्वगृही परतावे,’ असा सल्ला आठवले यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आतापर्यंत झाला तो अपमान बस झाला, यापुढे असा अपमान सहन करत काँग्रेसमध्ये राहू शकत नाही’
- नेहा धुपियाला गरोदरपणाचा असा ही त्रास…!
- ‘पवारांवर जनताच नाराज; त्यामुळे उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार नाही’
- ‘२०२४ च्या निवडणुकीनंतर शिवसेना वर्गणी जमा करण्यापूर्ती पण राहणार नाही’
- ‘..आता कोथळा काढायची भाषा केली जाते!’, शरद पवारांचे महाराष्ट्रातल्या परिस्थितीवर भाष्य


