🕒 1 min read
चंद्रपूर : काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात महत्वाचं विधान केलं होतं. ‘एकत्र आले तर भावी सहकारी’ असं विधान करत मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहिलं. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. महत्वाचं म्हणजे यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे देखील मंचावर होते.
गेल्या दोन दिवसांतील नेत्यांच्या विधानांमुळे राजकीय क्षेत्रात भूकंपाच्या हालचालींच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जातंय. महाविकास आघाडीत सर्व आलबेल सुरु असताना अशा विधानांची काय गरज ? असं देखील पवार यांनी म्हटल्याच्या चर्चा आहेत. यावर आता भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘शरद पवार यांना उध्दव ठाकरेंवर नाराजी व्यक्त करण्याचा कोणताही अधिकार नाही, त्यांच्यावर जनताच नाराज आहे,’ असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. ‘शरद पवार, तुम्हाला तर जनतेने निवडणुकीत नापास केलं होतं. तुम्ही दुसऱ्याच्या उत्तरपत्रिकेवरचं नाव खोडून स्वतःचं नाव टाकलं आणि सत्ता आली म्हणून सांगत आहात,’ असं म्हणत मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीसह पवार यांचा समाचार घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आतापर्यंत झाला तो अपमान बस झाला, यापुढे असा अपमान सहन करत काँग्रेसमध्ये राहू शकत नाही’
- खंडणीखोर देखील यांची कृती पाहून आत्महत्या करतील – सुधीर मुनगंटीवार
- मोठी बातमी : भाजपमधील काही आमदार राष्ट्रवादी आणि सेनेत करणार प्रवेश ?
- ‘२०२४ च्या निवडणुकीनंतर शिवसेना वर्गणी जमा करण्यापूर्ती पण राहणार नाही’
- ‘..आता कोथळा काढायची भाषा केली जाते!’, शरद पवारांचे महाराष्ट्रातल्या परिस्थितीवर भाष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
