इंग्लंड : लॉर्ड्स कसोटीतील दैदीप्यमान विजयानंतर लीड्स कसोटीत भारताला लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. ३५४ धावांच्या आघाडीसमोर टीम इंडियाचा दुसरा डाव २७८ धावांवर अटोपला. यासह इंग्लंडने भारताविरुद्ध दुसरा कसोटी सामना जिंकत मालिका १-१ अशी बरोबरी केली आहे.
टीम इंडियाच्या पराभवाच खापर अनेकांनी फलंदाजांनवर फोडले आहे. भारतीय फलंदाजांना मागील काही काळात मोठी खेळी करण्यात सातत्याने अपयश आलं आहे. त्यातच कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनाही धावा करण्यात सातत्याने अपयश आलं आहे. त्यामुळे भारताने इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीसाठी अतिरिक्त फलंदाजाची संघात निवड करण्याची गरज असून मुंबईकर सूर्यकुमार यादवला संधी दयावी असे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केलं आहे.
तसेच यावेळी त्यांनी विराट कोहलीला देखील सल्ला दिला आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार भारतीय संघाने फलंदाजांची फळी अधिक मजबूत करण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांनी हनुमा विहारीच्या आधी सूर्यकुमार यादवला संधी दिली पाहिजे. भारताने एका गोलंदाजाला वगळून सहा प्रमुख फलंदाजांसह खेळले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे.
सूर्यकुमारने मागील काही वर्षांत एकदिवसीय आणि विशेषतः टी-२० क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे तो कसोटी क्रिकेटमध्येही यशस्वी ठरू शकेल असा विश्वासही यावेळी त्यांनी दाखवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोहलीने लीड्स कसोटीतील पराभवाचे खापर फलंदाजीवर फोडले, म्हणाला..
- ९१ धावांवर बाद होताच पुजाराने तोडला राहुल द्रविडचा अनोखा विक्रम
- मैदानात घुसलेल्या ‘त्या’ व्यक्तीवर आजीवन बंदी; इंग्लिश काउंटी यॉर्कशायरने केली मोठी कारवाई
- लीड्स कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का, जडेजाला झाली मोठी दुखापत
- देशात महाराष्ट्र अग्रेसर ; कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या गेली दीड कोटीवर


