मुंबई : लॉर्ड्स कसोटीतील दैदीप्यमान विजयानंतर लीड्स कसोटीत भारताला लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. ३५४ धावांच्या आघाडीसमोर टीम इंडियाचा दुसरा डाव २७८ धावांवर अटोपला. यासह इंग्लंडने भारताविरुद्ध दुसरा कसोटी सामना जिंकत मालिका १-१ अशी बरोबरी केली आहे.
इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पराभवाचे खापर फलंदाजीवर फोडले. सामना संपल्यानंतर बोलताना तो म्हणाला, ‘खेळपट्टी फलंदाजीसाठी उत्तम होती त्यामुळे खेळपट्टीला दोष देण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजानी अचुक गोलंदाजी करत आम्हाला चुक करण्यास भाग पाडले. त्यामुळे आम्हाला धावा करणे कठीण झाले होते. तसेच आम्ही काही वाईट निर्णय देखील घेतले त्याचा परिणाम इंग्लंडच्या तुलनेत आमचे फलंदाज अपयशी ठरले.’ असे तो म्हणाला.
यावेळी बोलताना पुढे कोहली म्हणाला,’आमच्या वरच्या क्रमांकातील फलंदाजानी अधीक धावा करणे गरजेचे आहे. जेणेकरुन मधल्या फळीवर धावा करण्याचा दबाव येणार नाही. प्रत्येक वेळी खालच्या फलंदाजावर अवलंबून राहणे शक्य नाही.’ असे कोहली म्हणाला. यावेळी त्याने मालिकेतील पुढील कसोटी सामना जिंकत मालिकेत आघाडी घेण्याचा मानस बोलुन दाखवला.
महत्त्वाच्या बातम्या
- ९१ धावांवर बाद होताच पुजाराने तोडला राहुल द्रविडचा अनोखा विक्रम
- मैदानात घुसलेल्या ‘त्या’ व्यक्तीवर आजीवन बंदी; इंग्लिश काउंटी यॉर्कशायरने केली मोठी कारवाई
- लीड्स कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का, जडेजाला झाली मोठी दुखापत
- देशात महाराष्ट्र अग्रेसर ; कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या गेली दीड कोटीवर
- ओबीसी आरक्षण बैठकीला वांझोटी म्हणणाऱ्यांवर विजय वडेट्टीवार संतापले, म्हणाले..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

