मुंबई : इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय रविवरी भारत विरुद्ध इंग्लंड संघातील वनडे मालिकेतील तिसरा सामना झाला. या सामन्यात भारताने ७ धावांनी विजय मिळवत मालिका २-१ अशा फरकाने जिंकली आहे. या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने टी -20 मालिका 3-2 आणि कसोटी मालिका 3-1 अशा फरकाने जिंकली.
भारत दौरा संपवून खेळाडू आपल्या मायदेशी परतले आहे. याचदरम्यान, खेळाडू आपल्या याचदरम्यान इंग्लंडचा फलंदाज ओली पोपने भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. चेन्नईत खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने आपल्याला धमकावल्याचा आरोप पोपने केला आहे. पोपच्या म्हणण्यानुसार भारतीय कर्णधाराने त्याला कसोटी मालिकेतील उर्वरीत तीन सामन्यांसाठीच्या खेळपट्टीवरुन घाबरवण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप पोपने केला आहे.
पोप म्हणाला की, इंग्लंडचा संघ जेव्हा दुसऱ्या डावात फलंदाजी करत होता तेव्हा खेळपट्टीवर चेंडू चांगलाच टर्न होत होता. मी तेव्हा स्ट्रायकर एंडला उभा होतो. त्यावेळी विराट कोहली माझ्याकडे आला आणि म्हणाला, ही शेवटची वेळ आहे, जिथे तुम्ही सपाट खेळपट्टीवर खेळताय. त्याने मला ताकीदच दिली. त्याक्षणीच मला कळले होते की या मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये फलंदाजी करणे खूप आव्हानात्मक असणार आहे, असा किस्सा पोपने सांगितला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लवकर बरे व्हा मास्टर’ ; पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूची सचिनसाठी प्रार्थना
- श्रेयस अय्यरवर ८ एप्रिलला होणार शस्त्रक्रिया ; खांद्याला झाली दुखापत
- बनशेंद्रा येथे शेतात पाणी देणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला
- मुख्यमंत्र्यांच आनंद महिंद्रांना प्रत्युत्तर; केलं ‘हे’ आवाहन
- लॉकडाऊन कायमस्वरूपी बंद करण्याची परभणीमध्ये मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

