Share

…हा केवळ काश्मीरमधले शांततापूर्ण वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न- फारूक अब्दुल्ला

Published On: 

🕒 1 min read

जम्मू-काश्मीर : नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर आणि पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी शनिवारी दोन नागरिकांची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी भाष्य केले.

रविवारी यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधतांना ते म्हणाले की,’केंद्रशासित प्रदेशात नुकत्याच झालेल्या नागरी हत्यांमध्ये काश्मिरींचा सहभाग नाही. काश्मिरींना बदनाम करण्याच्या षडयंत्राखाली हे हल्ले करण्यात आले. यावेळी त्यांनी या घटनांना केंद्रशासित प्रदेशातील शांततामय वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हंटले. तसेच ते म्हणाले की,’या हत्या दुर्दैवी आहेत आणि एका षडयंत्राखाली केल्या आहेत. काश्मिरी लोक या हत्यांमध्ये सामील नाहीत. हा काश्मिरींना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे’. भारत आणि पाकिस्तान यांच्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील चर्चेबद्दल विचारले असता ‘मैत्रीकडे नेणारा कोणताही उपक्रम स्वागतार्ह आहे’ असे ते म्हणाले. तसेच आम्ही प्रार्थना केली पाहिजे आणि आशा केली पाहिजे की दोन्ही देशांमध्ये मैत्री आहे आणि आम्ही जगू शकतो’, असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर आणि पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी शनिवारी दोन परप्रांतीय नागरिकांची गोळ्या झाडून हत्या केली. २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी अल्पसंख्यांक समुदायाच्या चार नागरिकांसह एकूण सात नागरिकांची हत्या केली, त्यामुळे आसपासच्या परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झाले असून राजकीय पक्षांकडून सुरक्षा यंत्रणेवर टीका केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!