🕒 1 min read
नाशिक : राज्यात आजपासून अनलॉक-५ ची सी सुरुवात करण्यात आली आहे. मात्र या टप्प्यात देखील राज्यातील मंदिरं खुली करण्याबाबत राज्य सरकारने कोणतही पाऊल न उचलल्याने भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपचे अध्यात्मिक सेलचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी बार-रेस्टोरंट करणाऱ्या या ठाकरे सरकारला देवांबाबत इतका आकस का आहे? असा सवाल केला आहे.
“देवभक्तांच्या आड येण्याचं काम तसेच मंदिरावर अवलंबून छोटे-छोटे दुकानदार, व्यावसायिक आणि रिक्षाचालक असा गरीब घटकांची प्रचंड उपासमार होत आहे, इतकं निष्ठुर आणि निर्दयी सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात झालं नाही. हे असुरी सरकार आहे. गणेशोत्सव झाला, अधिक महिना देखील संपला आता नवरात्रोत्सव येतोय तरी सुद्धा सरकार मंदिर खुलं करत नसून भाजपने घंटानाद आंदोलन केले पण हे कुंभकर्णापेक्षा गाढ झोपलेलं सरकार आहे त्यांना कोणताही फरक पडत नाही” असा घणाघात आचार्य तुषार भोसले यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.
या सरकारमध्ये हिंदू मंदिर, परंपरा, सण याविषयी आकस असणारे व्यक्ती घटक आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या दबावाला बळी पडत आहेत हे सिद्ध झाल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. देशातील वैष्णोवदेवी तिरुपती बालाजी सह अनेक मंदीर खुले असुन भाविक दर्शन घेत आहेत माञ शिवरायांच्या महाराष्ट्रातील मंदिरे बंद आहेत. महाराष्ट्रात मंदीरे खुले नसल्यामुळे धार्मिक स्थळांमधील मंदीरावर अवलंबून असणाऱ्या हजारो लोकांचा उदारनिर्वाहाचा प्रश्न आज गंभीर बनला आहे, असे म्हणत भाजप नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या : –
- मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून भूमिका स्पष्ट करावी अन्यथा ‘मातोश्री’ बाहेर आंदोलन करू; मराठा समाज आक्रमक
- एमपीएससी परीक्षा पुढे ढकला, अन्यथा परीक्षा केंद्रचं फोडू; मराठा समितीचा आक्रमक इशारा
- राज्य सरकारच्या अडचणी वाढणार; 10 तारखेला महाराष्ट्र बंद ठेवण्याचा मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
- मराठा समाजाची बाजू लोकसभेत भक्कमपणे मांडणार- खा.सदाशिव लोखंडे
- मराठा आरक्षणासाठी सरकारने आमच्यावर मोर्चे काढण्याची वेळ येऊ देऊ नये – विनोद पाटील


