Share

‘कदाचित येणाऱ्या निवडणुकांमुळे ‘हा’ निर्णय घेण्यात आला असावा’ अतुल भातखळकरांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मराठी भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा निर्णय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आता यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाना साधला आहे.

मराठीत पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना २ अतिरिक्त वेतनवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.असा निर्णय पूर्वीही घेण्यात आला होता मात्र २०१५ पासून त्याची अंमलबजावणी अनाकलनीय कारणामुळे बंद होती. आता कदाचित येणाऱ्या निवडणुकांमुळे हा निर्णय घेण्यात आला असावा. असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.

दरम्यान महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा १०० टक्के वापर व्हावा, त्याचप्रमाणे महापालिकेचे सर्व व्यवहार जास्तीत जास्त सोप्या, सुटसुटीत आणि अर्थपूर्ण भाषेत व्हावे आणि मराठी भाषेचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी मराठी भाषा विषयामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्याबाबत मुंबई महापालिकेने ठराव मंजूर केला होता. त्यामुळे माय मराठीसाठी महापालिकेचा ठराव क्रमांक ११६५ ची अंमलबजावणी करण्यात यायलाच हवी, अशी भूमिका नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आता घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!