औरंगाबाद : हा देश मोदी सरकारच्या बापाची प्रॉपर्टी नाही; कॉंग्रेसचा हल्ला बोल! आहे. आणि तो मी मिळवणारच. हि घोषणा आज देण्याची वेळ आली आहे. आपण सर्वांनी केंद्राला हे ठणकावून सांगितले पाहिजे. देश विकायला दोन जण बसलेले आहेत. आता त्यांची नावे नाही घेणार. मात्र हा देश त्यांच्या बापाची प्रॉपर्टी नाही. हे त्यांनी लक्षात ठेवावे. औरंगाबाद काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित व्यर्थ न जाये बलिदान’ या विशेष कार्यक्रमात काँग्रेसचे या कार्यक्रमाचे समन्वयक विनायक देशमुख बोलत होते.
यावेळी बोलताना पुढे म्हणाले स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ईस्ट इंडिया कंपनीने भारतावर राज्य केले. त्याप्रमाणे आत्ता भारत सरकार देशावर हुकूमशाही गाजवत आहे. देशातल्या दोन मोठे आणि महान नेते देश विकायला बसलेले आहेत. त्यांना आपण ठणकावून सांगितले पाहिजे की हा देश त्यांच्या बापाची प्रॉपर्टी नाही. आता आपल्याला आपसातले मतभेद मिटवावे लागतील. १४ तारखेला फाळणीचा महोत्सव साजरा करणारे पंतप्रधान लाभणे हे आपले दुर्देव आहे. असेही ते म्हणाले.
शहर काँग्रेसने स्वातंत्र्य दिनानिमित्त सोमवारी (दि.१६) ‘व्यर्थ न जाये बलिदान’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर तसेच काँग्रेसने स्वबळाची घोषणा केल्यानंतर नाना प्रथमच शहरात आल्याने शहर आणि ग्रामीण काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून आला. औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी निराला बाजार येथील तापडिया नाट्यगृहात स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुणे कुण्याच्या बापाचं नाही’; मनसेच्या इशाऱ्याला कोकाटेंनी दिलं प्रत्युत्तर, वाद वाढणार ?
- छत्रपती शिवरायांबद्दल जेवढे तुम्ही वाचले नसेल, तेवढे मी ५० वर्षांपूर्वी वाचलेय–राज्यपाल कोश्यारी
- ‘महात्मा गांधी बोलायचे ते करायचे देखील, पण आज आपल्याकडे..’ राहुल गांधींची मोदींवर टीका
- ‘एक गोष्ट लाख सत्य, अमेरिकेने पूर्ण जगाशी गद्दारी केली अन्…’; जितेंद्र आव्हाड संतापले
- पुन्हा धुवाधार! राज्यात ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
