Share

‘भारतात मुस्लिमांना धोका नाही’; अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरून केआरकेने व्यक्त केली चिंता

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर जगभरात चर्चा सुरू आहेत. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणावर गोंधळ माजल्याचं चित्र दिसून येत आहे. तसेच, महिलांचे हक्क आणि त्यांचं संरक्षण याविषयी देखील जागतिक स्तरावरून चिंता व्यक्त केली जात आहे. अफगाणीस्तानमधील मुद्यावरून अनेक बॉलीवूड कलाकारानी देखील संताप व्यक्त करत चिंता व्यक्त करत आहेत. त्यानंतर आता केआरकेने अफगाणिस्तानमधून जे लोक स्थलांतर करत आहेत त्यांच्याबद्दल भाष्य केले आहे.

याबाबत केआरके म्हणतो की, सध्या त्या देशामध्ये जे काही चालले आहे ते गंभीर आहे. त्या देशातील मुस्लिमांची आपल्याला काळजी वाटते. भारत हा असा देश आहे की, जिथे मुस्लिमांना कोणताही धोका नाही. त्यांच्यासाठी अधिक सुरक्षित असलेला देश म्हणून आपल्याला भारताचे नाव घेता येईल, असे कमाल राशिद खान याने म्हंटले आहे.

तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळविल्यानंतर तेथील भारतीयांना पुन्हा मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत. पुन्हा घरी परतण्यासाठी त्यातही भारतीय कुटुंब काबूल विमानतळावर जमा होत आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!