नवी दिल्ली : देशात दररोज कोरोना रुग्णांची वाढती संख्या भीषण समस्या निर्माण करत आहे. यामध्ये आणखी समस्या निर्माण झाल्या आहेत त्या अपुऱ्या आरोग्य सेवांमुळे 2020 प्रमाणे याही वर्षी देशातकोरोनाने हाहाकार माजवला आहे. किंबहुना मागच्या वर्षीच्या तुलनेत कोरोना हा गंभीररित्या वेगानं देशात पसरत आहे.
या पार्श्वभूमीवर तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करून लसीकरणाचा वेग वाढवण्याऐवजी देशात बऱ्याच राज्यात कोरोना लसींचा तुटवडा भासत दरम्यान लसीच्या तुटवड्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार आमने-सामने उभे ठाकले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीचा तुटवडा असून केंद्राकडून लसीचा पुरवठा होत नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी यावर प्रतिक्रिया देत राज्य सरकार विनाकारण राजकारण करत असल्याची टीका केली होती.
या पार्श्वभूमीवर डॉ. हर्षवर्धन यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले की, ‘देशातल्या अनेक राज्यांकडून लसीकरण केंद्रावर लस संपल्याचं सांगितलं जात आहे. लस आणि लसीकरण यांचे नियोजन योग्य पद्धतीने करायला हवे, केंद्र राज्य सरकारला लस पुरवठा करते. त्यानंतर लसीकरण केंद्रापर्यंत लस घेऊन जाणं राज्य सरकारची जबाबदारी आहे. निर्धारित वेळेत लसीचे डोस लसीकरण केंद्रापर्यंत घेऊन जाणं हे राज्य सरकारचं काम आहे. यात जर कुठल्या राज्याने नियोजन केलेलं नसेल आणि लसीचे डोस खराब होत असतील, तर ते राज्य सरकारचं अपयश आहे. लस वितरणात कोणतंही राजकारण केलं जात नाहीये. असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.
महत्वाच्या बातम्या
- CSK-DC सामन्यात दोन भावांमध्ये झाली काटे की टक्कर
- उस्मानाबाद; कारवाईच्या धसक्याने शेतशिवारात लग्नाचा बार, निर्बंधांना जनतेकडून ठेंगा
- आज रंगणार केकेआर vs सनरायझर्समध्ये लढत
- धवन-पृथ्वीची तुफान खेळी; दिल्लीचा चेन्नईवर ७ विकेट्सने दणदणीत विजय
- 200 ब्रास वाळूच्या साठ्यासह दीड कोटीचा मुद्देमाल जप्त, गंगाखेड पोलिसांची कारवाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

