मुंबई : राज्यात कोरोना आटोक्यात आल्यामुळे राज्यभरात शिवजयंती दिनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं होतं. मात्र, कोरोना पुन्हा एकदा बळावत असल्याचं कारण देत शिवजयंतीवर ऐनवेळी निर्बंध घालण्यात आल्याने भाजप, मनसेसह राज्यभरातील शिवभक्तांनी संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडं, विविध पक्षांचे मोर्चे, आंदोलने सर्रास सुरु असल्याचं दिसून आलं आहे. राज्य सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यबहारात संवाद यात्रा काढून मेळावे घेतले, तर काँग्रेसने नाना पटोले यांचा प्रदेशाध्यक्ष पदग्रहण सोहळा रॅली काढत धुमधडाक्यात केला.
येत्या काळात शिवसेना देखील राज्यभरात ‘शिवसंपर्क’ अभियान राबवणार आहे. याबाबत मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेत्यांना आदेश देखील दिले आहेत. त्यामुळे शिवजयंतीवरच बंधन का ? असा सवाल उपस्थित होत आहे. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे.
‘प्रदेशाध्यक्षांची मिरवणूक असेल तर कोरोना नाही. मात्र अधिवेशन असेल तर कोरोना आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी कोरोना आहे. अधिवेशनाची वेळ आली की सरकारमधील मंत्री लगेच कोरोना वाढतो आहे, असं सांगतात आणि लॉकडाऊनची भाषा करु लागतात,’ अशी टीका त्यांनी केली आहे. पुढे त्यांनी, ‘हा कोरोना एखाद्या राजकीय पक्षाप्रमाणे वेगाने रंग बदलतोय,’ असा मिश्किल टोला देखील लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मराठा आरक्षणाच्या केसमध्ये मुख्यमंत्रीसाहेब तुम्ही स्वतः लक्ष घालावं; हलगर्जीपणा करु नये’
- स्वतःला बायकोचे ‘मालक’ समजणाऱ्यांना कायदेशीर तरतूदींमागची खोली कशी कळणार ? – चित्रा वाघ
- जावयाची वरात पोलिसांच्या दारात, सासरवाडीचे घर फोडून वीस हजारांवर डल्ला
- याद राखा…विदर्भ आणि मराठवाड्यासाठी आम्ही सरकारला सोडणार नाही; मुनगंटीवारांचा इशारा
- ‘राकेश टिकैत यांच्या आंदोलनाचे शेतकरी हिताशी काहीही देणे घेणे नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
