🕒 1 min read
मुंबई : ‘आपण इंटरनेटचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करतो. जे मूळ रूपाने भारतातून येत नाही. आपण कितीही चीनबाबत ओरडलो, तरी आपल्या फोनमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या चीनमधूनच येतात. जोपर्यंत चीनवर अवलंबून राहणं कमी होणार नाही, तोवर चीनसमोर मान खाली घेऊन झुकावेच लागेल’, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. भागवत यांनी आज रविवारी आयईएस राजा शिवाजी शाळेच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमत्त ध्वजावंदन केलं. यादरम्यान त्यांनी भारताच्या आर्थिक स्वातंत्र्यतेबद्दल भाष्य केले.
‘कोणत्याही परकीय आक्रमकाचे पाय आपल्या भूमीवर पडले की संघर्ष सुरू होत असे. परकीय आक्रमकांनी भारतावर अनेकदा हल्ले केले. पण आपण १५ ऑगस्टला त्याला पूर्णविराम दिला आहे. लढाई लढणारे महान पुरुष आपल्याला प्रेरणा देतात. त्यांची आठवण करण्याची ही वेळ आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर आपण आपलं जीवन जगण्यास मोकळे झालो, असे मोहन भागवत म्हणाले.
#WATCH | We use internet&technology. We don't have its actual technology&get it from outside. We might speak on China&call for boycott but where does everything on your mobile come from? If dependency on China increases, we'll have to bow before them: RSS Chief Mohan Bhagwat(1/2) pic.twitter.com/QpihPYKcCd
— ANI (@ANI) August 15, 2021
आत्मनिर्भर बनताना उत्पादनाच्या उत्कृष्टतेवर आपला भर असायला हवा. छोट्या-मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन द्यायला हवे. जे आपल्या देशात तयार होत नाही, जे अतिआवश्यक आहे तेच आपण निर्यात करायचे आहे. आपल्या अटींवर घ्यायचे आहे. स्वातंत्र्य तर आपल्याला मिळाले पण हे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी लोकांना योग्य बनणे आवश्यक आहे अशी भूमिका त्यांनी मांडली.
दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केलं. २१ व्या शतकात भारताला स्वप्न पूर्ण करण्यास रोखू शकत नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं. चीन आणि पाकिस्तानचं नाव न घेता त्यांनी हे मत मांडलं.
महत्वाच्या बातम्या
- भवानीच्या दरबारात मातेवर अन्याय! मुलीचा मृत्यू, डॉक्टर मोकाट; संयमाची ‘प्रतीक्षा’ संपल्याने आत्महदनाचा प्रयत्न
- आजपासून महाराष्ट्र अनलॉक, जाणून घ्या काय सुरू काय बंद?
- ‘..तर महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन निश्चित’, स्वातंत्र्यदिनीच मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा
- ‘मला अजितदादाही १२ आमदारांबद्दल बोलत नाहीत, तुम्ही कोण विचारणारे?’ राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले
- ‘जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका’, स्वातंत्र्यदिनी मोदींची मोठी घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
