मुंबई : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट अधिक भयंकर असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनेच राज्यासह देशभरात हाहाकार माजवल्यानंतर आता तिसरी लाट थोपवण्यासाठी विविध उपाययोजना राज्य सरकार आणि प्रशासन घेत असून नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन केलं जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनलॉक ची घोषणा करतानाच ऑक्सिजनची ठराविक मर्यादेपेक्षा अधिक गरज भासू लागल्यानंतर पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्यात येईल असं विधान केलं होतं.
आता राज्यातील सध्याची स्थिती आणि संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी भाष्य केलं आहे. ‘राज्यात एकीकडे निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे तर दुसरीकडे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या शक्यतेकडे सुद्धा टास्क फोर्सचे बारीक लक्ष आहे. राज्यामध्ये जर ऑक्सिजन पुन्हा मोठ्या प्रमाणावर लागला म्हणजे जवळपास राज्यात 700 मेट्रिक टनांपेक्षा अधिक ऑक्सिजनची गरज भासली आणि ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड वरील रुग्ण हे तीस हजारापेक्षा अधिक झाले तर तेव्हा निर्बंध लावावे लागणं हे अपरिहार्य असेल,’ अशी माहिती संजय ओक यांनी दिली आहे.
‘ टास्क फोर्सने अनेक बैठका घेऊन शासनाला निर्बंध कसे शिथिल करता येतील यबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार दुकाने, मॉल्स, जिम खुली करण्यात आली आहेत मात्र हे निर्बंध शिथिल करत असताना शासनाने समाजाकडून काही अपेक्षा ठेवल्या आहेत. मास्क सोशल डिस्टंसिंग, जिथे-जिथे वर फ्रॉम शक्य आहे या प्रणालीचा वापर करणं, कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थिती ठेवणे, क्यू आर कोड आयडी कार्ड असलेल्या व्यक्तींना लोकलमध्ये प्रवेश देणे या सर्व बाबींचा अंतर्भाव आहे,’ असं देखील डॉ संजय ओक यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आता महाराष्ट्राला अधिक सतर्क राहण्याची गरज’; तालिबान्यांनी हैदोसामुळे ‘या’ नेत्याने व्यक्त केली चिंता
- मुंडे भगिनी उपस्थित राहिलेल्या कार्यक्रमाच्या बॅनरवरून गोपीनाथ मुंडेंचा फोटोच गायब!
- मंदाकिनी खडसे हाजीर हो ! ; ईडीकडून समन्स जारी, उद्या बोलावले चौकशीला
- ज्या सुविधांचा विद्यार्थ्यांनी वापर केलेला नाही; त्या सुविधांचे शैक्षणिक शुल्क कमी करु, कुलगुरूंची ग्वाही!
- ‘जेलमध्ये टाकलं तरी शर्यत होणारच’; पोलिसांच्या धरपकड कारवाईनंतर पडळकर आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

