Share

‘…मग पेंग्विन गॅंगची पार्टी सुरु’; आमदार नितेश राणेंची महाविकास आघाडीवर खोचक टीका

Published On: 

मुंबई : टाळेबंदीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना आता ठाकरे सरकारने वाढीव वीजबिलात कोणत्याही प्रकारची सवलत देण्यास नकार दिला आहे. वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत मिळणार नसल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी महावितरणने वीज बिल वसुलीबाबत आदेश काढले होते, त्यावर बोलताना ऊर्जामंत्र्यांनी हे स्पष्ट केलं आहे.

महाविकास आघाडीने वीजबिल माफीवरून युटर्न घेतल्यामुळे जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप करत भाजपसह सर्वच विरोधी पक्षांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. आता भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील ट्विट करत सरकारला लक्ष्य केलं आहे. “या महाविकास आघाडी सरकारने ‘नाईटलाईफ’ जास्तच मनावर घेतले आहे अस दिसते.. विज बिल इतके हातात दिले की, कोणच भरणार नाही.. मग काय अंधारच अंधार.. आणि मग.. पेंग्विन गॅंगची पार्टी सुरु!!!” अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

दरम्यान, राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही, मीटर रिडींगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. ६९ टक्के वीज बिल वसुली पूर्ण झाली आहे, आता सवलतीचा विषय बंद झाला आहे. महावितरण ६९ हजार कोटीच्या तोट्यात आहे, आम्ही आता कर्ज काढू शकत नाही. महावितरणला आता वीज बिल वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत असं देखील राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!