🕒 1 min read
मुंबई: बुधवारी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अखेरचा दिवस होता. अखेरच्या दिवशी देखील भाजपने कमालीची आक्रमक भूमिका घेतली होती. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अनेक मुद्द्यांवरून भाजपने महाविकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती.
यातच बुधवारी अधिवेशनाची सुरुवातीलाच विरोधी पक्षाने महाविकास आघाडीवर जोर धरून ठेवला. अधिवेशनाची शेवट वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याने आणि एपीआय सचिन वाझे यांच्या बदलीने झाला. त्यामुळे विरोधी पक्षाने महाविकास आघाडीला जोरदार फटका दिला आहे. याचे संपूर्ण यश हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे असून त्यांना कायद्याची जाण, प्रशासकीय पकड, आणि आक्रमकता या जोरावर हे शक्य झाले आहे. मात्र राज्यात कोरोनाचे बळी वाढत आहेत, कोरोना संक्रमणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. महागाई आणि बेरोजगारीने कहर केला आहे. लोकांच्या जगण्या-मरण्याचे अनेक प्रश्न सतावत आहेत. त्यावर विधिमंडळात चर्चा घडवून विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला धारेवर धरले असते तर उत्तमच झाले असते, पण एका संशयास्पद मृत्यूचा धड तपास होऊ न देता आदळआपट करणे हे लोकशाहीचे विकृत रूप आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींवर चांगली चर्चा करता आली असती व विरोधी पक्षनेत्यांना त्यांचा अनुभव पणास लावता आला असता. असा सल्ला यावेळी शिवसेनेकडून फडनविसांना देण्यात आला.
‘संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षाला जास्त जबाबदारीने वागावे लागते, पण महाराष्ट्रात विरोधी पक्षाला अशा जबाबदारीची जाणीव फारशी दिसत नाही. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बुधवारी शेवट झाला, पण सत्ताधाऱ्यांचे कामकाज रोखण्याशिवाय विरोधी पक्षाने काय दिवे लावले? उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर एक संशयास्पद गाडी आढळली. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यालगतच्या खाडीत सापडला यावरून विरोधी पक्षाने विधिमंडळात कामकाज होऊ दिले नाही. ही गाडी सचिन वाझे या अधिकाऱ्याच्या ताब्यात चारेक महिन्यांपासून होती, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केला. संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी विरोधी पक्षाची मागणी आहे. अशी टीका आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.
राज्यात कोरोनाचे बळी वाढत आहेत, कोरोना संक्रमणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. महागाई आणि बेरोजगारीने कहर केला आहे. लोकांच्या जगण्या-मरण्याचे अनेक प्रश्न सतावत आहेत. त्यावर विधिमंडळात चर्चा घडवून विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला धारेवर धरले असते तर उत्तमच झाले असते, पण एका संशयास्पद मृत्यूचा धड तपास होऊ न देता आदळआपट करणे हे लोकशाहीचे विकृत रूप आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींवर चांगली चर्चा करता आली असती व विरोधी पक्षनेत्यांना त्यांचा अनुभव पणास लावता आला असता. शिक्षण, कायदा सुव्यवस्थेचे, इतरही काही प्रश्न आहेत. अर्थसंकल्पात एक लाख कोटीची महसुली तूट आहे. असे एक ना अनेक प्रश्न राज्याला भेडसावत आहेत. त्यावर बोलायचे नाही. लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार?’ असा सवाल आजच्या सामानातून करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- धोक्याची घंटा : औरंगाबादमध्ये मोठी लाट येण्याचा केंद्रीय आरोग्य पथकाचा इशारा
- औरंगाबादेत सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या पाचशेपार, ७ जणांचा मृत्यू
- अधिवेशन संपताच राज्य सरकारचा झटका;सामान्यांसह शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणार
- केरळ, तामिळनाडूत रिपाइं भाजपसोबत; तामिळनाडूत ‘इतक्या’ जागा येणार रिपाइं च्या वाट्याला !
- ‘देशात राहुल गांधींना आणि राज्यात नाना पटोलेंना कोणीही महत्व देत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

