Share

केरळ, तामिळनाडूत रिपाइं भाजपसोबत; तामिळनाडूत ‘इतक्या’ जागा येणार रिपाइं च्या वाट्याला !

Published On: 

पुणे : देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी (केंद्र शासित प्रदेश) विधानसभा निवडणुकांसाठी तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलेलं दिसून येत आहे. भाजपला फारसं यश मिळवता न आलेल्या पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या राज्यात कमळ फुलवण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.

आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची केरळ मध्ये भाजपशी युती होणार आहे, अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केली आहे. केरळ सोबतच तामिळनाडू मध्ये देखील रिपाइं भाजप सोबत जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

‘तामिळनाडू मध्ये ए आय डी एम के आणि भाजप सोबत रिपब्लिकन पक्षाची युती होणार असून एनडीए म्हणून तिथे रिपाइं ला 2 जागा सुटणार आहेत,’ अशी माहिती आठवलेंनी दिली आहे. तर, आसाम आणि पश्चिम बंगाल मध्ये रिपाइं चे प्रत्येकी 15 जागा लढविण्याची तयारी करण्यात आल्याचे देखील रामदास आठवले यांनी सांगितले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आठवलेंनी उत्तर प्रदेशचा दौरा केला होता. २०२२ मधील युपी विधानसभा निवडणुकीत रिपाइं भाजपसोबतच लढेल अशी घोषणा आठवलेंनी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीनंतर केली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!