Share

कोरोना प्रादुर्भावामुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत घेण्यात आला ‘हा’ निर्णय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय संघ सध्या श्रीलंका आणि इंग्लंड दौऱ्यावर आहे. यादरम्यान श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाच्या कार्यक्रमात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यानंतर आगामी मालिकेसंदर्भात श्रीलंका क्रिकेट बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

श्रीलंकेचा संघ नुकताच इंग्लंडच्या दौऱ्यावरुन परत आला आहे. या दौऱ्यावरुन मायदेशी परतण्यापुर्वी इंग्लंडच्या संघातील काही खेळाडूंना कोरोनााची लागण झाली होती. यानंतर मायदेशी परतल्यानंतर श्रीलंका संघाच्या सदस्याची आणि सपोर्ट स्टाफला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. यादरम्यान त्यांची कोरोना चाचणी केली असता श्रीलंका संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर आणि कामगिरी विश्लेषक शिरांथा निरोशन यांचा अहवाल सकारात्मक आला. यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या आगामी टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत बदल करण्याचा निर्णय घेतला.

भारताविरुद्धची मालिका १३ जुलै ऐवजी १७ जुलैला सुरुवात होत आहे. एकदिवसीय मालिकेतील सामने आता १७, १९ आणि २१ जुलै रोजी खेळवीण्यात येणार आहे. तर टी-२० मालिका २१ जुलैच्या ऐवजी २४ जुलैपासुन सुरु होणार आहे. या मालिकेतील सामने २४, २५ आणि २७ जुलै दरम्यान होणार आहे. मात्र श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अद्याप भारताविरुद्धच्या संघाच्या कर्णधारपदाची घोषणा केलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!