जालना : मराठा आरक्षणावर राज्य आणि केंद्र सरकार वेळकाढूपणा करत असल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. जालन्यात अख्खे गावच आंदोलनात उतरले असून गावकऱ्यांचे उपोषण सुरू आहे. अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव हे अख्खे गावच उपोषणाला बसले आहे. पहिले सात दिवस समाजबांधवांनी आंदोलन केले. परंतु, अजूनही यावर निर्णय घेतला जात नसल्यामुळे बुधवारपासून आता गावकऱ्यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे.
गावातील तमाम ग्रामस्थांनी अन्नत्यागाचा आरंभ केल्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत तीव्र झाला आहे. आरक्षणासाठी आता सरकारला थेट गावातच यावे लागेल, अन्यथा येथेच आत्मदहन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
शिक्षणात आरक्षण नसल्याने मराठा समाजातील तरुणांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. यामुळे या गावातील ग्रामस्थांनी शिक्षण न घेण्याचाही ठराव घेतला आहे. चांगले गुण असूनही नोकरी मिळत नाही, हलाखीची कौटुंबिक परिस्थिती असतानाही फीस भरून शिक्षण घ्यावे लागत आहे. यामुळे साष्टपिंपळगावातील ग्रामस्थ आणखीन आक्रमक होत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारचे मोठे यश; देशातल्या थेट परकीय गुंतवणूकीचा ओघ प्रचंड वाढला
- तृप्ती देसाई यांच्या विरोधात बाह्मण महासंघाचे पुण्यात ‘जोडे मारो’ आंदोलन
- तेरा वर्षीय मुलीसोबत लग्न, नवरदेवाविरोधात पॉक्सोचा गुन्हा
- ‘या’ दोन मोठ्या शेतकरी संघटनांनी घेतली आंदोलनातून माघार
- पक्षविरोधी भूमिकेचे आ. सावंत यांच्याकडून खंडण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

