Share

‘ठाकरे सरकार मराठा आरक्षणप्रश्नी कमी पडले, हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलंय,’ राणा जगजितसिंह यांचा आरोप

Published On: 

मुंबई: भाजप नेते आमदार राणा जगजितसिंह पाटील मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. त्यांनी मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र लिहिले आहे. ‘महाविकास आघाडी सरकार सत्तेत येण आणि सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करणे हा योगायोग नाही. महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणप्रश्नी न्यायालयात बाजू मांडताना कमी पडले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी १२ ऑगस्टच्या पत्राद्वारे मी आपणास मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी पहिली मागणी केली होती. तसेच आयोगावर योग्य संख्येने मराठा समाजाला प्रतिनिधित्व द्यावं ही देखील मागणी केली होती. आज ही मागणी करून १५ दिवस झाले तरी आपल्या सरकारकडून याबाबत कुठलेच ठोस पाऊल उचलले गेले नाही. यातूनच सरकारची मराठा समाजाबाबत खरी भावना दिसू येते. असेही ते म्हणाले आहेत.

पुरोगामी असलेल्या महाराष्ट्रात नेहमी मोठ्या भावाची व समजूतदारपणाची भूमिका घेणाऱ्या मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण आपण हिरावून घेतलं. यानंतर चुकीचे शासन निर्णय काढून तोंडाला पानं पुसली. आत्ता तर तुम्ही आमच्या आस्तित्वावरंच घाव घालत आहात. मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका असा इशाराही त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

महत्त्वाच्याा बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!