मुंबई : लीड्स कसोटीत टीम इंडियाने दुसऱ्या डावात जोरदार पुनरागमन केले आहे. पहिला डाव ७८ धावांवर अटोपल्यानंतर दुसऱ्या डावात भारताने २ गडी गमावून २१५ धावांची मजल मारली आहे. मात्र अद्यापही टीम इंडिया १३९ धावांनी पिछाडीवर आहे.
लीड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांवर अटोपला होता. यानंतर इंग्लंडने त्यांच्या पहिल्या डावात ४३२ धावांची मजल मारली. इंग्लंडच्या डावात कर्णधार जो रुटने १६५ चेंडुत १४ चौकारासह सर्वाधीक १२१ धावांची शतकी खेळी केली. तर भारताकडून या डावात मोहम्मद शमीने सर्वाधीक ४ गडी बाद केले. यासह इंग्लंडने पहिल्या डावात भारताविरुद्ध ३५४ धावांची भक्कम आघाडी घेतली.
It's Stumps on Day 3 of the 3⃣rd #ENGvIND Test at Headingley!
A solid & gritty batting display by #TeamIndia to end the day at 215/2. ????
9⃣1⃣* for @cheteshwar1
5⃣9⃣ for @ImRo45
4⃣5⃣* for captain @imVkohliScorecard ???? https://t.co/FChN8SDsxh pic.twitter.com/6gisdY7PXi
— BCCI (@BCCI) August 27, 2021
यानंतर दुसरा डाव खेळायला उतरलेल्या टीम इंडियाने पहिल्या डावातील अपयश विसरत दुसऱ्या डावात जोरदार पुनरागमन केले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने २ गडी गमावून २१५ धावांची मजल मारली होती. खेळ थांबला तेव्हा चेतेश्वर पुजारा ९१ आणि कर्णधार कोहली ४५ धावांवर खेळत होते. यापुर्वी सलामीवीर रोहित शर्माने १५६ चेंडुत ७ चौकार आणि १ षटकारासंह ५९ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर पुजाराने १८० चेंडुचा सामना करताना १५ चौकारासह ९१ धावांची नाबाद खेळी केली आहे. अद्यापही सामन्यात टीम इंडिया १३९ धावांनी पिछाडीवर आहे. चौथ्या दिवशी टीम इंडियाचा डाव किती लांबतो यावर सामन्याचा निकाल अवलंबुन आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबाद विमानतळ धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी केंद्रीय मंत्र्यांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र
- भारताचा विक्रम ; दिवसभरात तब्बल ‘इतक्या’ नागरिकांनी घेतली कोरोना लस
- ‘भुजबळ, धनंजय मुंडे हे ओबीसी आरक्षणाबाबत तोंडाला डिंक लावून गप्प बसतात’
- जनताच कुंभकर्णासारखी झोपलीये, मी एकटाच कधीपर्यंत लढू? – अण्णा हजारे
- मोठी बातमी : राज्यातील आणखी एका जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश
- कोरोना इफेक्ट! शिक्षण क्षेत्रावर अवकळा; अकरावी प्रवेशातही गडबड गोंधळ


